कला कलाकाराच्या आयुष्याला सकारात्मक कलाटणी देते.
अभिनेता : निमिष कुलकर्णी
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून सर्वांच्या घराघरात अतिशय कमी वेळात पोहचून रसिकांच्या मनात घर केलेला हस्याजात्रेचा चॉकलेट बॉय असलेला तसेच अलबत्या गलबत्या ,संगीत कोणे एकेकाळी ,लव एक्स्प्रेस या नाटकातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेला आत्ताचा तरुण उमदा अभिनेता आणि महाराष्ट्राची हस्यजत्रा फेम असलेला प्रामाणिक आणि विनम्र अभिनेता निमिष कुलकर्णी त्याच्याशी साधलेला कलात्मक संवाद …..
1) कलेचा वारसा लाभला कसा लाभला? कुटुंबातूनच कलेचा वारसा मिळाला का?
– खरतर माझ्या घरातून वारसा नाही लाभला कारण माझ्या कुटुंबात या अभिनय क्षेत्राशी निगडीत असे कोणीच नाहीये अगदीच मध्यमवर्गीय कुटुंब आणि साधी विचारसरणी असणारे माझे कुटुंब आहे .बाबांना माझ्या अभिनय या क्षेत्राची आवड होती त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी मला खूप पाठींबा दिला .नाटक शिबिरे आणि त्याचा अभ्यास मी करत गेलो आणि त्याच दृष्टीने पावले उचलत गेलो .माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या पाठींब्यामुळेच हे शक्य झाले.
2) या क्षेत्रातच का आलात? या क्षेत्राने आतापर्यंत तुम्हाला काय दिले?
– या क्षेत्रात आलो त्याच साधे उत्तरं आहे की आवड होतीच .मी क्रिकेट आणि अभिनय या क्षेत्रांच्या संभ्रमात होतो पण लहानपणीच ठरवले आणि अभ्नायाची अतिशय आवड असल्याने त्याचे आपसूकच रुपांतर करियरमध्ये झाले.आणि अभिनयाचा ठरवून प्रवास सुरु झालं .स्टेज आणि अभिनयाची आवड असल्याने शक्य झाले.
3) या क्षेत्रात आज प्रगती करीत आहात त्याचे श्रेय कोणाला जाते?
– भरपूर माणसांना माझ्या प्रगतीचे श्रेय जाते पण सर्वप्रथम माझे आई बाबा आणि कुटुंब आहे तसेच माझ्या बरोबर काम करणारे कलाकार देखील महत्वाचे म्हणजे माझे सगळे दिग्दर्शक म्हणजे सचिन गोस्वामी ,सचिन मोटे,त्याचप्रमाणे देवेंद्र पेम व अद्वैत दादरकर आदींना माझ्या प्रगतीचे श्रेय निःसंकोचपणे जाते .
4) या क्षेत्रातील स्पर्धेत स्वतःला टिकवून ठेवणे किती अवघड आहे? ते तुम्ही कसे करता?
– या क्षेत्रातल्या स्पर्धेत टिकणे हे लहानपणापासून ऐकत आलेले वाक्य आहे त्यामुळे त्याचे प्रेशर कधी कधी जास्त येत कारण बाकीची क्षेत्र सोप्पिएत आणि अभिनयात चढ उतार जास्त असतात असेच मध्यमवर्गीय कुटुंबात म्हटले जाते परंतु,पण माझ्यामते काम करत राहणे महत्वाचे आहे सतत काम केले की टिकणे फार अवघड नाही कारण मुंबईत आज अनेक मुल मुली अभिनयात चमकायला येतात त्याचे प्रेशर न घेता न थांबता कार्यरत राहणे महत्वपूर्ण आहे असेच मी मानतो.
–
5) फावल्या वेळात तुम्ही कोणता छंद जोपासता?
– फावल्या वेळात मी फिल्म्स ,वेब इरीज तसेच मोठ्या आसामींच्या मुलाखती व्यक्तिमत्व व सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने मी पाहत असतो तसेच क्रिकेट हा आता छंद आहे हा मी जपतो.मला डोंगर दर्यात फिरायला आवडते आत्ताच मी हिमाचल प्रदेशात २ वेळा जाऊन आलो .तो अतिशय सुखद अनुभव होता.
6) तुमचे भविष्यातील नियोजन काय आहे? पुढील काळात तुम्ही काय करणार आहात?
– अजून तरी नियोजन असे काही ठरवलेलं नाहीये पण सध्या काम करत राहणे अभिनय क्षेत्रात उत्तम उत्तमरित्या अभिनयातून लोकांना हसवत राहणे सध्या तरी करतो कारण प्रेक्षकांचे सकारात्मक प्रतिसाद अजून उमेद वाढवून जातात .
7) सध्याच्या सोशल मीडिया ट्रोलिंगबद्दल तुम्हाला काय वाटते?
– सोशल मिडिया मध्ये मी लक्ष नाही देत .पण कोणी कोणी मला मेसेज करतात की तुझ्या बद्दल अशी कॉमेंट होती त्याकडे फारसे लक्ष न देणे हेच उत्तम आहे कौतुक फार डोक्यावरही न घेणे आणि नकारात्मक प्रतिक्रियांनी खचून देखील न जाणे याचा उत्तम सुवर्णमध्य साधून फक्त प्रामाणिकपणे अभिनयात काम करत राहणे हेच मला महत्वाचे वाटते.
शब्दांकन : तन्मयी नचिकेत मेहेंदळे (उपसंपादिका ,पीपीसी न्यूज पुणे)