मुंबई: राज्यातील स्तरनिहाय अनलॉक बाबतचा आदेश अखेर जारी करण्यात आला आहे. करोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण पाच तर निश्चित करण्यात आले आहेत. यात पाच टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या २५ टक्के पेक्षा कमी ऑक्सीजन बेड व्यापले आहेत असे जिल्हे निर्बंध मुक्त राहणार आहेत. तर ५ टक्के पॉझिटिव्हिटी दर व २५ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड भरले आहेत अशा जिल्ह्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. दर गुरुवारी निश्चित निकषानुसार स्थिती आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात येणार असून त्याआधारे कुठे निर्बंध कमी करायचे आणि कुठे वाढवायचे याबाबतचा नाव आदेश लागू केला जाणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी पुढील आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच सोमवारपासून होईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रशासकीय पातळीवरील या निर्बंधाची अंमलबजावणी केली जाईल.
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जी माहिती दिली होती ती खरी निघाली आहे. जो आदेश जारी करण्यात आला आहे त्यात तसेच निकष निश्चित करण्यात आलेले आहेत.४ जून या तारखेचा हा आदेश मध्यरात्रीच्या सुमारास हाती आला आहे. या आदेशानुसार निर्बंध बाबत ५स्तर तयार करण्यात आले आहेत. यात पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात जे जिल्हे येणार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. दर आठवड्याला करुणा स्थितीनुसार हे जिल्हे बदलणार आहेत.
अनलॉक करत असताना ५ स्तर तयार करण्यात आले आहेत. पहिल्या स्तरात दहा जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या स्तरात दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. तिसऱ्या स्तरात १५ जिल्ह्यांचा समावेश आहे तर चौथ्या स्तरांमध्ये आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. सध्या पाचव्या स्तरात एकही जिल्हा नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्या वाढली तर पाचव्या स्तरात त्या जिल्ह्याचा समावेश केला जाईल. २०टक्क्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी रेट असेल आणि ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील, तो पाचवा स्तर असेल.
*असे आहेत ५स्तर:*
पहिला गट: पहिल्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये पाच टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि 25 टक्के होऊन कमी ऑक्सिजन बेड ची ऑक्युपन्सी असेल अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबाद ,भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर,धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव ,जालना, लातूर, नागपूर ,नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे.
दुसरा गट: दुसऱ्या गटांमध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ते४० टक यांदरम्यान ऑक्सिजन बेड ची ऑक्युपन्सी असेल अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. अहमदनगर ,अमरावती, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर ,नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात आहे.
तिसरा गट: तिसर्या गटात या जिल्ह्यांमध्ये ५ते१० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ४० टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेड ची ऑक्युपन्सी असेल अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. अकोला, बीड, कोल्हापूर ,उस्मानाबाद ,पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
चौथा गट: चौथ्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये १०ते२० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ६० टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेड ची ऑक्युपन्सी असेल अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्याचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
पाचवा गट: पाचव्या गटात ज्या जिल्ह्यांमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आणि ७५ टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेड ची ऑक्युपन्सी असेल अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. पाचव्या गटात कायम रेडझोन राहणार आहे.
![*'अनलॉक' बाबत राज्य सरकार तर्फे पूर्ण लॉक डाऊन मुक्तीचे निकष जाहिर.*](https://ppcnews.in/wp-content/uploads/2021/04/uddhav_1583220755.jpg)
*’अनलॉक’ बाबत राज्य सरकार तर्फे पूर्ण लॉक डाऊन मुक्तीचे निकष जाहिर.*
Share this: