पुणे:- केंद्र सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. महागाई, बेरोजगारीत वाढ होत असून जीवनावश्यक वस्तूंबरोबर पेट्रोल, डिजेल, गॅसचे दर वाढले आहे तसेच न पाहिलेल्या अच्छे दिन, सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण अश्या अनेक समस्या सध्या सामान्य नागरिकांना भेडसावत आहेत म्हणून आज वडगावशेरी मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे होळी करण्यात आली.
त्यावेळी बोलताना युवक अध्यक्ष किरण खैरे यांनी सांगितले की, आपण महाराष्ट्रात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करतो यावेळी नैराश्य, दारिद्र्य जाऊन सुख शांती नांदावी ही प्रार्थना करतो पण आज खऱ्या अर्थाने पाहिले तर सुशिक्षित तरुणांना बेरोजगार पणामुळे नैराश्य आले आहे व महागाई मुळे सामान्य जनतेला दारिद्र भोगावे लागत आहे आणि हे सर्व मोदी सरकार मुळे होत आहे त्यामुळे आज मोदी सरकार च्या नावाने बोंबा मारून होळी पेटविण्यात आली. यावेळी अध्यक्ष किरण खैरे, उपाध्यक्ष सुहास तळेकर, सरचिटणीस नरेंद्र साबळे, चेतन येवले, राहुल वैद्य, गणेश सानप,श्रेयस वैद्य, राजेश आबनावे, सिद्धार्थ अष्टेकर, निखिल गायकवाड, योगेश शितोळे व कार्यकर्ते उपस्थित होते.