पुणे : पूजा चव्हाण या युवतीने आत्महत्या करून २० दिवस झाले तरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. वेळो वेळी पोलिस आयुक्तांना निवेदन दिले जात होते.
प्रदेशाध्यक्षा उमा खापरे व प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, पुणे भाजप शहर अध्यक्ष जगदीशजी मुळीक यांच्या मार्गदर्शन खाली तसेच पुणे शहरात महिला मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला होता. असे शहराध्यक्षा अर्चना तुषार पाटील म्हणाल्या.
पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी संजय राठोड विरोधात गुन्हा दाखल करावा. अशी लेखी तक्रार अर्ज भाजप पुणे शहर उपाध्यक्ष स्वरदा बापट यांनी केला होता. याची दखल घेऊन आघाडी सरकारने मंत्री संजय राठोडचा राजीनामा घेतला. आणि भाजपा महिला मोर्चाचेच्या संघर्षाचा यश आले आहे. असे महिला आघाडीचे म्हणणे आहे.
पूजाला जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत आम्ही शांत बसणार नाही. राजीनामा दिला असला तरी त्यांची चौकशी झाली पाहिजे. यासाठी पाठपुरावा केला जाईल. असे पाटील म्हणाल्या.
![भाजपा महिला मोर्चा आघाडीच्या मागणीला यश](https://ppcnews.in/wp-content/uploads/2021/02/IMG-20210228-WA0004.jpg)
भाजपा महिला मोर्चा आघाडीच्या मागणीला यश
Share this: