“शास्त्रीय संगीत म्हणजे एक आराधना”
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय शास्त्रीय संगीताला नवीन ओळख
देणारे नाव म्हणजे पंडित विश्वमोहन भट्ट ! स्वतःच्या नावाने एक
भारतीय शास्त्रीय वाद्य जगभरात पोहचवून त्याचा प्रसार, प्रचार
आणि विकासाचे काम भट्ट यांनी केले. त्यांच्याशी साधलेला स्वरमयी
संवाद…
• गुरु शिष्य यांचे नाते आणि परंपरा यांकडे तुम्ही कसे बघता ?
– गुरु उत्तम आणि जाणकार असला तरच शिष्याची तालीमही उत्तम होते. मी
स्वतः १९९३ साली ‘ग्रॅमी’ हा पुरस्कार परदेशी घेतला आणि मला असा वाटते
की गुरुजवळ बसून विद्या ग्रहण करून स्वतःच्या सांगीतिक विचाराने तो अभ्यास
आणि रियाज वाढविणे हे गुरु शिष्य परंपरेमध्ये महत्वाचे आहे, ज्यात वीणेचा
इतिहास आणि प्रत्येक रागाचा अभ्यास, हात कसा वळवावा आणि रियाज करावा
याची बारकाईने तालीम घेणे गरजेचे आहे.
• रियालिटी शो आणि त्यातून पुढे येणाऱ्या कलाकारांना कोणत्या गोष्टी
शिकण्याची गरज आहे असे तुम्हाला वाटते ?
मूलतः रियालिटी शो वाईट आणि त्यातून येणारे कलाकार चुकीचे असा
समाज ठेवणे चूक आहे पण संगीताची रियालिटी दाखवताना पाया पक्का असणे
जास्त गरजेचे आहे. सांगीतिक बैठक आणि मनापासून अभ्यास आणि मेहेनत
घेऊनच या क्षेत्रात जावे. संगीत आणि संस्कृतीचा पाया हा संगीतानेच पक्का होतो,
त्यासाठी मुलांना शिकवताना व घडवताना संगीताची मुलभूत पायाभरणी केली
आहे का हे पडताळणे गरजेचे आहे. मुख्यतः शिकविण्याची सुरुवात उत्तम होणे
गरजेचे आहे.
• फ्युजन आणि त्या दरम्यानच्या गती प्रेक्षकांना आवडतात का ?
– मी स्वतः नव्याचे स्वागतच करतो. त्यामुळे ही संकल्पना ऐकण्यासाठी चांगली
आहेच पण आपल्या पारंपारिक रचना आणि वाद्यांना नवीन जोड देऊन नवे सादरीकरण करण्यासाठी उत्तम आहे असे मला वाटते. परंतु त्यासाठी सरस्वती
मातेची आणि संगीताची आराधना आणि त्यांचा पाया पक्का करण्याची नितांत गरज
आहे. फ्युजनमुळे आपले भारतीय संगीत हे जागतिक पातळीवर पोहोचण्यास मदत
होत आहे. फ्युजन करण्यापेक्षा देखील शास्त्रीय बाज आणि त्याचा बाराकाईने
अभ्यास व रागांचे महत्व समजन घेणे आवश्यक आहे
सादरीकरण करण्यासाठी उत्तम आहे असे मला वाटते. परंतु त्यासाठी सरस्वती
मातेची आणि संगीताची आराधना आणि त्यांचा पाया पक्का करण्याची नितांत गरज
आहे. फ्युजनमुळे आपले भारतीय संगीत हे जागतिक पातळीवर पोहोचण्यास मदत
होत आहे. फ्युजन करण्यापेक्षा देखील शास्त्रीय बाज आणि त्याचा बाराकाईने
अभ्यास व रागांचे महत्व समजून घेणे आवश्यक आहे.
• वाद्यसंगीत आणि वाद्याचा अभ्यास या विषयी तरुणाईला काय सांगाल ?
– शास्त्रीय संगीत हा पाया आहे आणि मुलभूत शाश्वत आहे. आज अनेक हजारो
लाखो वर्षे मालकंस, यमन, भूप, सारंग वगैरे राग विधात्याची सेवा म्हणून
आळवले जातात, गायले अथवा वाजवले जातात. ते फक्त सतत घोटून केलेल्या
मेहेनतीमुळे, रियाज आणि बैठकीमुळे. त्याची जोड संगीताच्या अभ्यासाला आणि
संशोधनाला देऊन अभ्यास करून सादरीकरण करावे.
• चित्रपटसंगीत आणि त्यातील वाद्यवृंद या बद्दल तुमचे मत ?
– मी एका नव्या पिढीच्या लगान या चित्रपटामध्ये ए.आर. रेहमान यांनी संगीत
दिलेली एक रचना वाजवली आहे. ती तरुणपिढीपासून सगळ्यांना भावली आहे.
माझ्या दृष्टीने ही देवाची कृपादृष्टी आहे कारण, आपण आजन्म विद्यार्थीदशेत राहून
संगीताचा अभ्यास वाढवावा आणि चित्रपटसंगीत, वंदेमातरम् किंवा काही चित्रपट
संगीताशी निगडीत रचना वाजवून शास्त्रीय बाज अजून पक्का करावा. त्यामुळे
चित्रपट संगीताचा आधार हाही शास्त्रीय संगीतच आहे पण नवीन कल्पनांचे
स्वागत आहे असे मला प्रकर्षाने वाटते.
• पुणेरी श्रोत्यांच्या बद्दल तुमच्या मनात कोणती भावना आहे ?
पुण्याचे लोक हे कानसेन आणि संगीताचे दर्दी, जाणकार आहेत. सर्वात
महत्वाची गोष्ट म्हणजे पुण्यातील रसिक श्रोते ऐकतात, शिकतात आणि
आत्मसातही करतात. हीच आमच्यासाठी सर्वात महत्वाची बाब आहे आणि मुळात
मोहनवीणा हे वाद्य माझ्या नावाने ओळखले जाते यात मी स्वतःला भाग्यवान
समजतो. आजन्म मी संगीताचा अभ्यासक आणि विद्यार्थी आहे तो कलेच्या आणि
कानसेन रसिकांच्यामुळेच आहे.
ग्रॅमी अवॉर्ड मिळाले तो अनुभव कसा होता ?
‘अ मिटिंग बाय द रिव्हर’ या माझ्या ‘आरपी कुडर’ यांच्या समवेतच्या
अल्बमसाठी मला १९९३ साली ‘ग्रेमी’ हे जागतिक अॅवॉर्ड मिळाले तेव्हा एक
भारतीय कलाकार म्हणून खूप छान वाटले व अभिमान वाटला.
शब्दांकन – तन्मयी नचिकेत मेहेंदळे (उपसंपादक; पीपीसी न्यूज नेटवर्क)