पि पी सी न्युज; अजय जाधव!
जागतिक महामारी कोरोनाने संपूर्ण जगाला वेठीस धरले असताना. महाराष्ट्रात वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एप्रिल महिन्यापासून पुन्हा लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अनेक गरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. या गोरगरिबांना मदत पोहचवणे करता सरकारी यंत्रणांना थोड्याफार प्रमाणात अपयश आले. अनेक कुटुंब उपासमारी मुळे त्रस्त झाली. अनेक स्वयंसेवी संस्था दानशूर व्यक्ती नी ह्या कोरोना काळात अशा गरीब व्यक्तींना मदतीचा हात देऊ केला.
दापोडी येथील समाजसेविका सुप्रिया शशांक साळवी (काटे), आणि अस्मिता कांबळे (मोरे) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या वाढदिवसानिमित्त दापोडी येथील हातावर पोट असलेल्या गोरगरिब ५०० कुटुंबांना अन्नदानाचा कार्यक्रम राबविला. समाजासाठी सतत काहीतरी धडपड करणाऱ्या या समाज सेविकांनी सदर कार्यक्रमाप्रसंगी गोरगरिबांना मदतीचा हात देऊन आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखी भेट आपल्या लाडक्या नेत्याला दिली. तसेच या शुभ क्षणी आपल्या लाडक्या नेत्याचे सर्व स्वप्ने साकार व्हावी वाढदिवस आपल्या अनमोल क्षणांची आठवण ठरावी अशा शुभेच्छा देण्यात आल्या.