राजीव सातव यांना १९ एप्रिलपासून अस्वस्थ वाटत होतं.
कोविडची लक्षणं दिसत असल्यानं त्यांनी २१ एप्रिल रोजी
करोना चाचणी केली होती. २२ एप्रिल रोजी चाचणी
अहवाल समोर आल्यानंतर त्यांना करोनाचा संसर्ग
झाल्याचं निष्पन्न झालं. अहवाल आल्यानंतर दुसऱ्या
दिवशी म्हणजे २३ एप्रिल रोजी सातव यांना पुण्यातील
जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
सुरूवातीला त्याची प्रकृती चांगली होती. मात्र, २५
एप्रिलनंतर प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना अतिदक्षता
विभागात अर्थात आयसीयू वार्डात हलवण्यात आले होते.
त्यानंतर त्यांना मुंबई हलवण्याची चर्चाही सुरू झाली होती.
मात्र, त्यांच्या प्रकृतीत पुन्हा सुधारणा होऊ लागली होती.
गेल्या काही दिवसांपासून
करोनाशी झुंज देत असलेले काँग्रेसचे नेते राजीव सातव
यांचं निधन झालं. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर
रुग्णालयात मागील २० दिवसांपासून उपचार सुरू होते.
सुरूवातील त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, नंतर
त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती काँग्रेसकडून
देण्यात आली होती. मात्र, दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती
पुन्हा खालावली होती. त्यानंतर त्यांची प्राणज्योत
मालवल्याचंच वृत्त काँग्रेसकडून देण्यात आलं. त्यांच्या
निधनानंतर राजकीय वर्तुळासह सर्वच स्तरातून हळहळ
व्यक्त होत आहे
दरम्यान, शनिवारी (१५ मे) काँग्रेसचे नेते व मंत्री
बाळासाहेब थोरात यांनी रूग्णालयात जाऊन, सातव
यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेत विचारपूस
केली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ‘राजीव सातव
यांना काल रात्र थोडा त्रास जाणवला, मात्र ते लवकरच बरे
होतील,’ असं म्हटलं होतं मात्र, त्यानंतर उपचारादरम्यान
त्यांची प्राणज्योत मालवली.
![काँग्रेस नेते राजीव सातव यांचे निधन](https://ppcnews.in/wp-content/uploads/2021/05/1621145765091.jpeg)
काँग्रेस नेते राजीव सातव यांचे निधन
Share this: